ग्रामपंचायत संगणक परिचालकांना ६ महिण्यापासुन मानधन मिळेना,प्रशासन करतो टाळाटाळ गोंदियाः- गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली.ग्रामपंचायत मधील ११ आज्ञावली मध्ये ऑनलाईन माहीती भरणे,लोकांना दाखले देणे,ग्रामपंचायत मधील माहीती ही ऑनलाईन पध्दतीने सरकार पर्यंत पोहचविणे हे महत्वाचे काम असुन संगणक परिचालकांना ६ महिण्यापासुन मानधन मिळाला नाही. संगणक परिचालकांची मानसिकता ही ढासळली आहे.कित्येक ऑपरेटर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होण्यास तयार आहेत.ज्यांच्यावर त्यांचे पोट आहे त्यांनी करावे काय?अशा स्थितीत संगणक परिचालकांची आहे. सरकारने व प्रशानाने आमचा विचार करुन आम्हाला आमच्या हक्काचा मानधन द्यावा अशी मागणी संगणक परिचालकांची आहे.
