देवरीः- गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो.गोंदिया जिल्हात अंदाजे हजारो हेक्टर मध्ये धानाचे पिक घेतले जाते.गोंदिया जिल्हात शेतकरी यांचे धान घेण्यासाठी शासनाने विविध संस्था नेमल्या आहेत.त्या संस्थामध्ये शेतकरी आपले धान विकण्यासाठी नेतात.शेतकरी यांनी आपले धान विकुन सदर दोन महिणे झाले आहेत त्यांना आता पर्यंत त्यांच्या धानाचे चुकारे मिळाले नाहीत.शेतक-यांनी उन्हाळी हंगामात आपले संपुर्ण पैसे शेतीला लावले आता खरीप आला खरीप च्या वेळेवर त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी विचारात पडला आहे. शेतकरी लोकांना दुकानदार उदारी खात,दवाई,इतर साहीत्य देत नाही म्हणुन शेतकरी हा कर्ज घेवुन शेतीचे साहीत्य खरेदी करतो.त्याचे कर्ज वाढत जावुन जे पैसे मिळणार आहेत ते पैसे कर्जात जाणार आहेत. शासनाने उन्हाळी हंगामातील खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तात्काळ त्यांच्या खात्यात द्यावे. शेतकरी बांधवाच्या समस्या बघुन बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.




