देवरीः- देवरी तालुक्यात अंदाजे २ ते ३ दिवसापासुन पाण्याची सुरुवात झालेली आहे.९ तारखेला रात्री मुसळधार पाऊस आल्यामुळे सर्व ठिकाणी पाणिच-पाणि जमा झाले होते.सिरपुरबांध येथील गेट पुर्ण सुरु झाल्यामुळे नदी जवळील शेती पुर्ण पाण्याखाली आल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकशान झाले आहे.शेतक-याचे पाईप,मोटार,लाईट,सर्व पुराने वाहुन गेले आहेत.शेती पिकाखाली आल्यामुळे शेतीतील धान पिक शुध्दा वाहुन गेले आहे. तरी शासनाने पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ मदत करावी अशी गावक-यांचे मागणी आहे.
