देवरीः- देवरी तालुक्यात सर्वात जास्त धान पिकांचे उत्पादन घेतल्या जाते.आज प्रत्येक शेतकरी हा मार्केट वर निर्भर असतो.आज शेतकरी वर्गाला शेती करावयाची मानसिकता होत नाही.आज शेतीला लागणारा खर्च हा दुप्टीने वाढला आहे.आज सलग 5 ते 6 वर्षात खत्यांच्या किंमत सरासरी 50 ते 60 टक्यांनी वाढ झाली आहे.औषधी व बियाणे या मध्ये शुध्दा झपाट्याने वाढ झालेली आहे. 1 ऐकर ला सरासरी 35000 हजार खर्च होत आहे.1 एकर जमीन मध्ये उत्पादन 20 ते 22 क्विंटल होत आहे. आज शासनाच्या नियोजन अभावी शेतकरी बांधवाना 1890 ते 1900 रुपये क्विंटल भावाने धान विक्री करावी लागत आहे.त्यामध्ये 20 क्विंटल धानाचे 38000 हजार रुपये किंमतीचे होत आहे.जो शेतकरी रात्र-दिवस मेहनत करतो त्यांची पण किंमत निघत नाही.याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.आज शासनाची किंमत 2360 असुन मार्केट मध्ये कमी भावात धान खरेदी होत आहे. शासनाने व प्रशासनाने मार्केट कडे लक्ष देवुन शेतकरी लोकांना योग्य भाव मिळावा यांची अंमलबजावणी करावी.




