भारत देशात मुस्लिम समाजापेक्षा ओबिसी समाजावर सर्वात मोठा अन्याय
देवरीः- आज 7 ऑगष्ट मंडल दिन आहे.आज ओबिसी समाजाला भारतातील सांविधानिक पदावर विराजमान होण्यासाठी आयोग तयार करण्यात आला.भारताला स्वतंत्र 1947 ला मिळाला त्यानंतर 1949 ला सांविधानिक अधिकार मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा पासुन ओबिसीना सांविधानिक अधिकार मिळाले नाही.भारतामध्ये मा. कांशिराम जी यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमाने मंडल आयोग लागु करो वर्णा खुर्ची खाली करो चा नारा देवुन भारत भऱ सायकल य़ात्रा काढुन सरकारला दबावात आणुन व्ही.पी,सिंग यांना मंडल आयोग लागु करावा लागला. भारतातील उच्च वर्णीय लोकांनी षढयंत्र करुन ओबिसीना त्यांचे अधिकार कळु दिले नाही.भारतात सर्वात प्रथम विरोध करणारा पक्ष म्हणजे बीजेपी होय.आज भारतात बीजेपी सरकार आहे तरी ह्या सरकारने ओबिसी चा स्वतंत्र कालम दिला नाही. ह्या देशातील जे ओबिसी बिजेपी पक्षात खासदार,आमदार,व स्थानिक क्षेत्रात आहेत ते मौन का? सामान्य ओबिसी विचार करतो की हे का बोलत नाही.ओबिसी चे नेते बिजेपी पक्षातुन निवडुण गेल्यावर हे कुणाचे गुलाम होतात हाच मोठा प्रश्न सामान्य ओबिसी पुढे आहे.


