गोंदिया :- जिल्ह्यात तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व कार्यकर्त्यांना कधी ही विश्वासात न घेता फक्त एकेरी निर्णय घेणे, तसेच पक्ष वाढविण्यासबंधी कोणत्याही प्रकारची मीटिंग न घेणे, कार्यकर्त्याचा मनोबल कमी करणे कार्यकर्त्याचा सतत अपमान करणे, आणि जिल्हा पातळीवर जनहितार्थ समस्यांचा निराकरण न करणे, जे पदावर बसलेली मधली पद घेऊन गप्प बसले असणार व प्रत्येक तालुक्यात भेट नाही पक्षाची परिस्थिती बाबत विचारणा होत च नसेल तर, असली निष्ठा कसल्या कामाची मुबई तील पदाधिकारी सुध्दा दोन ते चार लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन संबंध बेस्ट म्हणून नजर अंदाज करीत असल्यामुळे शेवटी गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभुषन बैस, युवांमध्ये सगळ्यात जुने मनसे शहर गोंदिया संघटक व मनविसे जिल्हा उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, तसेच शहर उपाध्यक्ष रजत बागडे, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर उपाध्यक्ष अनिकेत सांडेकर, शहर प्रसिद्धी प्रमुख कृष्णा ढोंगे शहर सहसचिव अजय कलाणे, तालुका उपाध्यक्ष वैभव खोब्रागडे (दवनीवाडा) खेमराज ठाकरे, (परसवाडा) विपीन पारधी (धापेवाडा), राणा नागपुरे (फुलचुर), राहुल यावलकर (फुलचुर) राहुल बाकरे (श्रीनगर) मनविसे चे निखिल गडपायले, रितीक नागपुरे व अन्य पदाधिकारी यांनी आपला राजीनामा दिला. तसेच या नंतर सुध्दा अनेक तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते मनसे पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत हे कार्यकर्त्यांना मूर्ख समजत आले, कार्यकर्तेच पक्षातला कणा असतो कार्यकर्ता नाही तर पक्ष नाही..




