देवरीः- देवरी तालुक्यातील सिरपुरबांध येथे ९ ते १० तारखेला मुसळधार पाऊसामुळे सिरपुरबांध धरणामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे तेथील संपुर्ण गेट सुरु केल्यामुळे सिरपुरबांध येथील नदी काठावरील शेतक-याचे विद्युत पंप हे पुराने वाहुन गेले तेथील विद्युत खांब तुटल्यामुळे शेती पंपाची विद्युत बंद पडली आहे.शेतकरी वर्गाचे मिटर,स्टार्ट,ग्रिप,पेट्या,वाईर,पाईप सर्व हे पुरात वाहुन गेले त्यामुळे शेतक-यांच्या पिकासोबत विद्युतचा नुकशान झालेला आहे.शेतकरी बांधवाना विद्युत विभागाने शुध्दा शेतक-यांना आर्थिक साह्य करण्यासा
ठी शासनाला कळवुन सांगितले पाहीजे. विद्युत विभागाने सिरपुरबांध येथील लाईट लवकर दुरुस्ती करुन द्यावी कारण पुरामधुन काही धान पिकाचा काही भाग उरलेला आहे त्याला वाचविता येईल तरी विद्युत विभागाने लवकर लाईट दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.




